माझे मनोगत
बोधकथा
- Home
- संकलित मूल्यमापन
- बोधकथा
- बालगीते
- सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे (हिंदी)
- आपला वर्धा जिल्हा
- राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा
- शाळा साहित्य
- Computer Shortcut Keys
- डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम
- अभ्यासाचे तंत्र व मंत्र
- चालू घडामोडी
- महत्वाचे पर्यावरणविषयक व सामाजिक दिवस
- विरामचिन्हे
- 100% मूलभूत वाचन विकास
- NAS अध्ययन स्तर निश्चिती
- संवर्गनिहाय जात माहिती
- मराठी स्वराज्याचा इतिहास
- शिक्षकांची कर्तव्ये आणि भूमिका
- सेवा पुस्तक नोंदी..नियम व अटी
- श्री सुरज वैद्य यांची व्यंगचित्रे
- एक भारत श्रेष्ठ भारत - भाषा संगम उपक्रम
- Tech Sudha You Tube Channel
- सातवे वेतन आयोग अधिसूचना
- शाळा सिद्धी मानके व मूल्यांकन आराखडा
- मतदार यादीत शोधा आपले नाव
- राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा मसुदा 2019 ( मराठी )
- सामान्य ज्ञान
Friday 13 September 2024
प्रतिपश्चंद्र
Tuesday 16 July 2024
हिंदू धर्माची व्याप्ती
सुखं नास्ति विना धर्मं तस्मात् धर्मपरो भव ॥
पृथ्वीवरील सर्व प्राण्यांना सुखाची लालसा असते परंतु धर्माचनाशिवाय सुख नाही म्हणून मानवाने धर्मपरायन बनावे असे हिंदू धर्म सांगतो. ह्या सुखप्राप्तीसाठी ( ऐहिक ) हिंदू धर्म थोडक्यात दोन सार सांगतो अ ) जगात एक सर्वश्रेष्ठ सर्वव्यापी, अनादी, अनंत अंततः एकाच सत्य ( सत्व ) आहे. वैयक्तिक सत्व हा केवळ त्या सर्वव्यापी सत्वाचा एक अंश आहे आणि ह्या सर्वव्यापी सत्वाची जाणीव प्राप्त करण्यासाठी सतत प्रयत्नशील रहा. ब ) आत्मप्राप्ती, सर्वव्यापी तत्वांशी एकरूपता आणि त्या दैवी तत्वांशी संबद्ध होणे किंवा मोक्ष हेच जीवन साधनेचे उद्दिष्ट्य आहे आणि यातच जीविताचे व संपूर्ण मानव समाजाचे सार्थक आहे. फक्त एका विशिष्ट असा समुदाय डोळ्यापुढे न ठेवता पृथ्वीवरील सर्व सजीव व अखिल मानव समाजाला आदर्श जीवन जगण्याची संकल्पना हिंदू धर्म आपल्यापुढे अगदी सहज सोप्या पद्धतीने सांगत आहे. हिंदू धर्म कर्मप्राधान्य धर्म आहे. जीवनाच्या विविध टप्प्यात आपले कर्मप्राधान्य कोणते असावे याचे आदर्श विवेचन भगवान श्रीकृष्णांने अर्जुनाला कुरुक्षेत्रावर श्रीमद भगवदगीतेमध्ये सांगितलेले आहे म्हणूनच भगवदगीता संपूर्ण हिंदू आणि मानवी समाजाला मार्गदर्शक असा पवित्र ग्रंथ मानला जातो.
आज संपूर्ण जगात सर्वत्र हिंसेने थैमान घातले असताना हिंदुबहुल भारत देशात सर्व धर्मीय भारतीय मात्र गुण्यागोविंदाने नांदत आहेत यातच हिंदू धर्माची खरी व्याप्ती दिसून येते. आ सेतू हिमालय पसरलेल्या या देशात सनातन असा हिंदू धर्म अस्तित्वात असताना देखील ह्याच मातीत दोन नवीन धर्माने आपले अंकुर रोवले आणि जगाला परत एकदा अहिंसेच्या पुनरोच्चार व विश्व बंधुतेचा मार्ग दाखविला. त्यापैकी एक म्हणजे बौद्ध धर्म आणि दुसरा म्हणजे जैन धर्म. हिंदू धर्माची व्याप्ती इतकी मोठी की, या दोन धर्माला व त्यांचे पालन करणाऱ्या धर्मियांना आपले शत्रु न मानता ह्या देशात त्यांना धर्म परंपरा पालन करण्याची मोकळीक दिली...कारण सर्वच धर्म अखिल मानव जातीच्या कल्याणाचा मार्ग सांगतात..असे हिंदू धर्म मानतो. आपल्या धर्माचा अर्थ कसा काढायचा हे मात्र त्या त्या धर्मीय बांधवावर अवलंबून आहे. जगात सर्व धर्मात आस्तिक ही संकल्पना अस्तित्वात आहे म्हणजे त्या त्या धर्माने सांगितलेल्या मार्गावर तुम्हाला चालावेच लागते. हिंदू धर्माची व्यापकता मात्र इतकी मोठी आहे की, एखादा व्यक्ती नास्तिक असेल तर त्यालासुद्धा हिंदू धर्म सामावून घेतो.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणतात, ‘हिंदू धर्म हा बहुरूपी आणि परस्परविरोधी प्रवृत्तींचे संमिश्रण होऊन बनलेला आहे. या धर्माच्या दोन बाजू आहेत. विशिष्ट प्रकारच्या सामाजिक चालीरीती किंवा समाज-रचनेचे विशिष्ट कायदे ही याची सर्वांत प्रमुख अशी बाजू आहे आणि परस्परविरोधी अनेक पारमार्थिक संप्रदाय ही त्याची दुसरी प्रमुख बाजू होय.’ तसेच ‘हिंदू धर्म ही विविध सामाजिक आचारविचारांची एक गठडी किंवा एक संग्रह आहे आणि विसदृश आध्यात्मिक व पारलौकिक विविध कल्पनांचाही त्यात भरणा आहे.’ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् म्हणतात, ‘अनेक उपासनामार्ग, विविध उपास्य देवता, बहुविध धर्मद्रष्टे यांचा त्यात संग्रह आहे. हा धर्म व्यक्तिनिष्ठ नाही हा विशिष्ट पंथाचा आग्रह धरीत नाही हा धर्म अधिकारभेदाने सगळे धर्म संग्राह्य आहेत, असे मानतो… अनेक प्रकारचे पारमार्थिक उन्नतीचे पंथ यांच्यामुळे हिंदू धर्म परमतसहिष्णू झाला आहे.’ ‘वेदांविषयी प्रामाण्यबुद्धी, साधनांची अनेकता आणि उपास्य दैवत कोणते असावे यांविषयी निश्चित नियम नसणे, हे हिंदू धर्माचे लक्षण होय. ‘प्रामाण्यबुद्धिर्वेदेषु’ हे तत्त्व स्वीकारून पारंपर्यागत व श्रुतिस्मृति-पुराण-प्रतिपादित विधिसंस्कार किंवा आचार पाळणारा तो हिंदू होय’, असे लोकमान्य टिळक म्हणतात. इह व पर किंवा प्रपंच व परमार्थ साधण्याचा मार्ग हेच हिंदू धर्माचे स्वरूप होय. परधर्माविषयी सहिष्णुता हे हिंदू धर्माचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. तो सत्य, अहिंसा, दया, प्रेम इ. सद्गुणांवर आधारलेला आहे.
समस्त जगाचे कल्याण व्हावे तसेच संपूर्ण मानव जातीवर विशेष संस्कार व्हावे यासाठी हिंदू धर्माने वैज्ञानिक कसोटीवर खरे असे सोळा संस्कार मानवाला सांगितले आहेत. हे सोळा संस्कार हे हिंदू धर्मीयांचे संस्कार विधी आहेत. हे संस्कार मानवी मूल्याशी निगडीत बाब आहे. गर्भधारणेपासून ते विवाहापर्यंत हिंदू व्यक्तीवर, आईवडील व गुरूंकडून ज्या वैदिक विधी केल्या जातात त्यास संस्कार असे म्हटले जाते. सात्त्विक वृत्तीची जोपासना व्हावी हा संस्कार विधी करण्यामागचा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे. मनुष्यामध्ये असलेल्या सद्गुणांचा विकास व संवर्धन करणे तसेच दोषांचे निराकरण करणे हा संस्कारांचा पाया आहे. गुह्यसुत्रामध्ये यावर बरीच चर्चा केली आहे. अनेक ग्रंथामध्ये या संस्काराच्या विषयावर लिखाण केले गेले आहे. हिंदूंच्या पूर्वजांनी मानवजातीच्या कल्याणासाठी व उन्नतीसाठी संस्कारांची योजना केली आहे. संस्कार हा साधनेचाही विषय आहे. संस्कारामुळे ईश्वराचे स्मरण होते. माणसाचे व्यक्तिगत जीवन निरामय, संस्कारीत, विकसीत व्हावे व त्याद्वारे उत्तम, चारित्र्यसंपन्न, सुसंस्कारीत व्यक्ती निर्माण व्हाव्यात. त्याद्वारे चांगला समाज व पर्यायाने एक चांगले व सुसंस्कृत, बलशाली राष्ट्र निर्माण व्हावे हा यामागील प्रमुख उद्देश आहे.हिंदू धर्मातील सोळा संस्कार (षोडश संस्कार) खालिलप्रमाणे आहेत गर्भाधान ,पुंसवन,अनवलोभन,सीमंतोन्नयन,जातकर्म, नामकरण,सूर्यावलोकन,निष्क्रमण,अन्नप्राशन,वर्धापन, चुडाकर्म,अक्षरारंभ,उपनयन,समावर्तन, विवाह,अंत्येष्टी..
जगाला ज्ञान देणारे चार वेद, सहा शास्त्रे आणि अठरा पुराण तसेच रामायण, महाभारत आणि संपूर्ण जगाला आपले विराट दर्शन घडविणारी भगवद्गीता ही हिंदू धर्माने संपूर्ण मानवजातीला दिलेला अमूल्य असा ठेवा आहे. वेद,भगवद्गीता हे केवळ ज्ञानाची चर्चा करणारे वाङ्ममय नाही ज्ञानाचा विनियोग केव्हा करावा, कसा करावा याचे योग्य मार्गदर्शन करणारा महान ठेवा आहे. ७ नोव्हेंबर २००३ रोजी युनेस्कोने वेदांना ‘मौखिक’ म्हणजेच ‘अमूर्त अशी वाडवडिलोपार्जित मालमत्ता’, म्हणून घोषित केले आहे.संपूर्ण भारतीयांना अभिमान वाटावा, अशीच ही गोष्ट आहे. म्हणून वेदांचे जतन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.परंतु, हे केवळ ज्ञानाचे वैभव अथवा ठेवा म्हणून जपून न ठेवता लोककल्याणासाठी त्याचा योग्य विनियोग व्हायला हवा.समाजात अनेक प्रकारचे लोक असतात. जसे सज्जन असतात; तसे दुर्जनही असतात. सज्जनांमुळे समाज सुधारतो. समाजाला सन्मार्ग सापडतो. सज्जन समाजाच्या हितासाठी झटत असतो; पण दुर्जनाचा समाजाला त्रास होत असतो. दुसऱ्याला त्रास देण्यात, दुसऱ्याच्या सुखात विघ्न निर्माण करण्यात त्यांना आनंद वाटत असतो. अशा विघ्नसंतुष्ट लोकांच्या ठायी, दुष्ट, दुर्जनांच्या ठायी सद्विचार यावा, त्यांचे दुष्ट विचार गळून पडावेत अशी प्रार्थना संत ज्ञानेश्वर परमेश्वराकडे करतात.
यत्र नार्यस्तु पूज्यंते, तत्र रमन्ते देवताःTuesday 19 September 2023
शासकीय अपरिहार्यता.....व्यवस्थेचे अपयश की आणखी इतर....?
Wednesday 23 August 2023
We are on the moon......
Saturday 29 July 2023
ग्रेट भेट
Wednesday 25 January 2023
राष्ट्रीय मतदार दिवस
Tuesday 5 April 2022
अ-सत्यमेव जयते
Sunday 5 December 2021
उंबरठा ओलांडायचा....माफी पण नाही आणि विसरायचं पण नाही....
Friday 21 May 2021
मी आणि नथुराम
Monday 4 January 2021
डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील भारत आणि आजची शिक्षण व्यवस्था
Saturday 2 January 2021
NH - 7 ( तो अकरा तासाचा प्रवास )
Tuesday 10 November 2020
एडॉल्फ हिटलर आणि दुसरे महायुद्ध : सत्य आणि विपर्यास
मग शिक्षण आणि नौकरी निमित्त्यानं थोडं वाचन कमी झालं पण थांबलं नाही...एकदा एका मुलाखतीत आमच्या एका वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांनी प्रश्न विचारला की,दुसऱ्या महायुद्धाला कोण जबाबदार होतं ? मी उत्तर दिलं इंग्लंड.त्यांनी थोडं स्मित केलं.वर्षे लोटलीत आणि फेब्रुवारी 2019 ला फेसबुक वर एका पुस्तकाच्या प्रकाशनाची जाहिरात म्हणू या किंवा निमंत्रण बघण्यात आले. पुस्तकाचं नावं होतं “ एडॉल्फ हिटलर आणि दुसरे महायुद्ध : सत्य आणि विपर्यास ” शिर्षक बघताच माझ्यातील वाचक पुन्हा जागा झाला.मी सरळ पुस्तकाचे लेखक मा.श्री पराग वैद्य सरांना फोन केला पुस्तकाची माहिती घेतली आणि श्री सच्चिनानंद शेवडे यांच्या हस्ते प्रकाशित सदर पुस्तकाची कॉन्टिनेंटल प्रकाशन पुणे येथे मागणी नोंदविली...लेखकांचा आणि माझा एवढाच काय तो परिचय...
मनोगत व्यक्त करताना लेखक महोदयांनी पुस्तकाच्या नवव्या पानात आपल्या सर्व धारणांना हादरा दिलाय. हे पुस्तक म्हणजे काही कादंबरी नाही आहे.ना लेखकांनी कुठेही कल्पनेचे उंच झोके घेतले आहेत. जवळपास बारा वर्षे शेकडो पुस्तकांचे अखंड अध्ययन करून त्यांनी तटस्थपणे फक्त सत्यकथन केलेले आहे.यावरून लेखकांची प्रचंड मेहनत लक्षात येते.एखादया प्रश्नाचे उत्तर आपल्याला येत नसेल तर ते आपल्या शत्रूच्या गोटातून मिळवावं असं म्हणतात.लेखकांनी नेमकं तेच केलं त्यांनी नाझी जर्मन शत्रूच्या गोटात लिहिली गेलेली पुस्तके..प्रतिवृत्ते...इंग्लंड,अमेरिका,पोलंड,फ्रान्स,रशिया या देशाचे राष्ट्रप्रमुख,त्यांचे परराष्ट्र मंत्री,सचिव, राजदूत,इतर देशातील उच्च पदावरील शासनकर्ते यांच्यातील गुप्त चर्चा, दूरध्वनी,त्यांचे पत्रव्यवहार,त्यांच्या वैयक्तिक नोंदी,जगात विविध देशात एडॉल्फ हिटलवर लिहिली गेलेली हजारो पुस्तके,जागतिक वृत्तपत्रे व त्यातील लेख यांचा सखोल अभ्यास करून सदर पुस्तक आपल्या समोर मांडले आहे.नाझी शत्रूंना नेमके हिटलर या असामान्य योध्याविषयी काय वाटत होते आणि हेतुपुरस्सर जगापासून तो इतिहास का लपवला गेला ??? संपूर्ण जगास उत्तरार्ध सांगितला गेला पण पूर्वार्ध आपणापासून का दडवून ठेवण्यात आला.?नेमका हाच वेध या पुस्तकात घेतला गेला आहे. आपल्याविषयीचे अचूक सत्यकथन आपला शत्रूच करू शकतो,याविषयी कुणीही शंका घेऊ शकत नाही.सातशे अडतीस पानाच्या या पुस्तकात एकशे पंचवीस पाने फक्त संदर्भ ग्रंथाची यादी प्रसिद्ध करायला लागली आहेत.यावरून या पुस्तकाची सत्यता,भव्यता आणि मा.लेखक श्री पराग वैद्य सरांची चिकाटी आपल्या लक्षात येते.
आज ऐतिहासिक संदर्भात आपण आपल्या अवतीभोवती जे बघतोय आणि आपली धारणा करून बसतो ते अर्धसत्य असते.अन्यथा ब्रम्हचार्याचे व्रत करताना टेकू म्हणून आपले हात ठेवायला स्त्रिया कशाला हव्यात? जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी युद्ध कशाला हवे ???? या प्रश्नांची उत्तरे आपल्याला हवी असतील तर हे पुस्तक नक्की वाचा.सत्याच्या आड कुणाची तरी चमचेगिरी करायची आणि शांततेच्या बाता मारताना आपले धार्मिक अहंगंड कसे पूर्णत्वास नेले जातात याचा नेमका वेध या पुस्तकाने घेतला आहे..जेमतेम फक्त सहा महिने पुरेल एवढी युद्धसिद्धता असताना हिटलरने खरेच जागतिक युद्ध पुकारले होते काय? एका असामान्य योध्याने आपल्याला ज्याप्रमाणे सांगितले गेले आहे त्याप्रमाणे साठ लाख ज्यूंची हत्या केली होती काय?? जर्मनीत नेमके ज्यूंचे स्थान काय होते अथवा एक नागरिक म्हणून जर्मन देश उभारणीत त्यांची भूमिका काय होती याचा इतिहास खूपच मनोरंजक आहे.जर्मनीत वास्तवात गॅस चेम्बर होते काय?? आपणास जे गॅस चेंबर दाखविले गेले मग ते कोणत्या देशात उभारले गेले होते ?? तेथे नेमके काय सुरू होते ? दुसरे महायुद्ध हे एखादया सिनेमाच्या कथेप्रमाणे जर्मनीवर नाझी शत्रूंनी का लादले त्यातुन त्यांना काय हस्तगत करायचे होते ?? हे आजही गूढ आहे. हे गूढ आपणापासून हेतुपुरस्सर का दडविण्यात आले ??? या जगात खरंच सहिष्णुता सर्वधर्म समभाव नावाच्या गोष्टी असतात काय ??? की आपल्याला फक्त मूर्ख बनविले जाते...याचे उत्तर शोधणे हे आपले कर्तव्य आहे.कर्तुत्वशून्य माणसाला महान(महात्मा) म्हणून सांगायचे आणि जो आपल्या वैयक्तिक स्वार्थाआड येतो त्या महान सेनानीला अगदी योजनाबद्ध पद्धतीने खलनायक ठरवायचे हा आजवरचा इतिहास तपासायची तयारी असेल तर नेमकं हे पुस्तक वाचावे...
युद्ध हे ज्या देशांचे व्यसन होते आणि शस्त्र विक्रीतून मानवी संहार हे ज्यांचे ध्येय होते तेच देश आजही संपूर्ण जगाला शांततेचे आणि निशस्त्रीकरणाचे उपदेश देत असतात. जो अमेरिका आज संपूर्ण जगाला दहशतवाद विरोधी ब्रम्हज्ञान सांगत असतो, त्याचे स्वतःचे दुसऱ्या महायुद्धकालीन दहशतवादी कृत्ये या पुस्तकाने समोर आणली आहेत.तसेच आजच्या काळातील इराक व लिबिया येथे त्यांनी केली कृत्ये याचीच साक्ष देतात. जपान या देशाची अगतीकता त्यातून त्या देशाने स्वरक्षणार्थ उचललेले पाऊल याविषयी खूप विस्ताराने या पुस्तकात माहिती देण्यात आली आहे त्याउलट रशियाचा विस्तारवाद व त्यांच्या सेनेने संपूर्ण मानव जातीला लाजवून सोडतील अशी केलेली महाभयानक कृत्ये वाचतानाआपल्यालाही हादरवून सोडतात आणि नेमका हाच इतिहास आपल्यापासून दडवून ठेवला गेला आहे.आपल्याला ज्ञात नसलेले जैविक व रासायनिक युद्ध नाझी शत्रूंनी कसे पुर्णत्वास नेले.याचे संपूर्ण विस्तारीत विवरण या पुस्तकात मा.पराग वैद्य सरांनी अगदी अचूक मांडले आहे.
आपला छुपा धार्मिक विस्तारवाद जगावर थोपविण्यासाठी नाझी शत्रूंनी एक काल्पनिक शत्रू उभा करून संपूर्ण जगाला महायुद्धाच्या खाईत लोटले व वरून खोटा मानवता वादाचा बुरखा चढवत आपली पापे लपवून ठेवलीत.स्वतःला लोकशाही देश म्हणविणाऱ्या नाझी शत्रूंनी केलेल्या भयानक कत्तली जेव्हा या पुस्तक रूपाने आपल्यासमोर येतात तेव्हा आपणास चीड यावी इतके दुसरे महायुद्ध हे प्रकरण गंभीर आहे.या युद्धात खरंच अणूबॉम्ब वापरण्याची गरज होती काय ??? की अमेरिका ता देशाला त्याची युद्ध खुमखुमी भागवायची होती? नोबेल पारितोषिक विजेता व अणुबॉम्बचा जनक मानल्या जाणाऱ्या माणसाची वास्तविकता काय होती?? मनात आणले असते तर सर्व नियम धाब्यावर बसवून हिटलरला हे युद्ध जिंकता आले असते काय??? या सर्व प्रश्नांचा वेध या पुस्तकात घेतला गेलेला आहे.हे युद्ध पद्धतशिरपणे घडवून आणून इतका मोठा मानवी नरसंहार का केला गेला ? हे ज्यांना जाणून घ्यायची उत्सुकता आहे त्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचवयास हवे.असं म्हणतात की युद्ध हे कोणत्याच समस्येवर उपाय नसते.पण ते आपल्या देशाच्या आणि वंशाच्या संरक्षणासाठी लढावेच लागते. हिटलर या असामान्य योध्याने व लोकनियुक्त राष्ट्रप्रमुख म्हणून त्यांनी ते लढून आपले कर्तव्य पार पाडले.
मी काही समीक्षक नाही व तेवढी माझी पात्रता पण नाही. एक वाचक म्हणून मला जे वाटले ते मी येथे लिहिले आहे...खूप वर्षांनी एक अतिशय अभ्यासपूर्ण पुस्तक वाचायला मिळाले याबद्दल मी या पुस्तकाचे लेखक श्री पराग वैद्य सरांचे खूप खूप आभात मानतो. यासाठी त्यांनी जे शारीरिक,मानसिक व आर्थिक ताण सहन केला आहे त्याला तोड नाही.लेखकाच्या मनोगतापासून ते शेवटच्या पानापर्यंत आपणास लेखकांनी खिळवून ठेवण्यात यश मिळविले आहे आणि पुन्हा तोच विपर्यास केला गेलेला इतिहास आपल्या धारणांना हादरे देत जिवंत केला आहे. ज्या व्यक्तीवर आजवर हजारो पुस्तके लिहून त्याचं चारित्र्य हणन करण्यात धन्यता मानली गेली नेमकं त्याच प्रवाहाविरुद्ध बंड करून एका असामान्य योध्याला व राष्ट्रपुरुषाला न्याय देण्याचे धाडस या पुस्तकाचे लेखक मा. श्री पराग वैद्य सरांनी केले, त्याबद्दल मी स्वतः त्यांचा वैयक्तिक ऋणी आहे. नक्की वाचा....
भ्रमणध्वनी - 9881493820
Thursday 3 September 2020
मेटाकुटीस आलेल्या हेमाचे मनोगत
Saturday 1 August 2020
नात्याचं ऑडिट ...
Monday 22 June 2020
“ रॉ " भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढकथा
Sunday 14 June 2020
चंदेरी दुनिया आणि वास्तविकता
- गणेश
Tuesday 26 May 2020
DP
Wednesday 5 February 2020
ह्या नराधमांचे काय करायचे...?
समाजमन सुन्न करणाऱ्या हिंगणघाट येथील निषेधार्ह घटनेतील आरोपी नगराळेला नक्कीच फाशी व्हायला हवी यात दुमत असूच शकत नाही...पण आपल्या आजूबाजूला रोज आपणास भेटणारे पांढरपेशे विकृत नराधम यांचं काय करायचं...CAA व NRC सारख्या विषयावर आपली बुद्धी पाजळणारे कथित बुद्धीजीवी ; जेथे रोज संविधानाचे दाखले देऊन आपली राजकीय पोळी शेकली जाते आणि “ बेटी बचाओ बेटी पढाओ ” चळवळ राबविली जाते या आपल्या देशात खरंच स्त्री सुरक्षित आहे काय ??? आणि ती स्वतःला असुरक्षित समजत असेल तर मग दोष द्यायचा कुणाला ??? की, अजूनही आपण रानटी अवस्थेत जगत आहोत. नौकरी निमित्य घराबाहेर पडणाऱ्या देशातील करोडो स्त्रिया त्यांना भेडसावणाऱ्या समस्या यावर आपण कधी चर्चा करणार आहोत ??? प्रवास करताना एखादी महिला आपल्या बसमध्ये किंवा रेल्वेत बसली की, तिला टोमणे मारणारे, विकृत शेरेबाजी करणारे असे कित्येक कुबुद्धी प्राणी आपल्याला अवतीभोवती दिसत असतात. त्यात जर महिला ओळखीची असली तर तिच्या खाजगी आयुष्याचा तिच्या पाठीमागे उद्धार करणारी नीच मनोवृत्तीची माणसे यांचं काय करायचं...आपल्याच सोबत खांद्याला खांदा लावून विविध क्षेत्रात काम करणारी महिला आपल्यातच असुरक्षित असेल तर इतर महिला व त्यांना रोज सहन करावा लागणारा अपमान याचा विचार न केलेला बरा... शिक्षणाने कामधंदा मिळतो पण सुसंस्कृतपणा हा जो गुण लागतो तो आणायचा कोठून ???
एकदा प्रत्येकाने आत्मचिंतन नक्की करावे की , खरंच माझ्यासोबत सहप्रवासी असलेल्या महिला भगिनींशी माझे वर्तन कसे आहे ? त्यांच्यासमोर त्यांना हेतुपुरस्सर ऐकू जाईल या भाषेत मी आपल्या सहकाऱ्यांशी कुठला वार्तालाप करतो..एखाद्या महिलेला मी शेरेबाजी करतो तेव्हा तिच्या मनावर काय आघात होत असेल...असे अनेक प्रश्न आहेत ज्यावर आज लिहिता येईल...सामूहिक शेरेबाजी करून दात विचकावताना आपल्याला समाज बघत असतो याचसुद्धा भान आपल्याला राहू नये...म्हणजे किती हा निगरगट्टपणा..हिंगणघाट येथील नराधमाला शासन नक्कीच होईल पण आपल्यातील सुशिक्षित नराधमांना शिक्षा कोण करणार ??? हिंगणघाट येथील निषेधार्ह घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण देशात उमटत असताना आणि सोशल मिडियावर आपण आपला राग व्यक्त करत आहोतच व यासमोर जाऊन आपण महिलांना एक स्वतंत्र व्यक्तिमत्व समजून त्यांना शांततामय जीवन जगण्याचा अधिकार देणार आहोत काय ??? शेवटी निर्णय आपला आहे..
- गणेश