माझे मनोगत
बोधकथा
- Home
- संकलित मूल्यमापन
- बोधकथा
- बालगीते
- सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे (हिंदी)
- आपला वर्धा जिल्हा
- राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा
- शाळा साहित्य
- Computer Shortcut Keys
- डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम
- अभ्यासाचे तंत्र व मंत्र
- चालू घडामोडी
- महत्वाचे पर्यावरणविषयक व सामाजिक दिवस
- विरामचिन्हे
- 100% मूलभूत वाचन विकास
- NAS अध्ययन स्तर निश्चिती
- संवर्गनिहाय जात माहिती
- मराठी स्वराज्याचा इतिहास
- शिक्षकांची कर्तव्ये आणि भूमिका
- सेवा पुस्तक नोंदी..नियम व अटी
- श्री सुरज वैद्य यांची व्यंगचित्रे
- एक भारत श्रेष्ठ भारत - भाषा संगम उपक्रम
- Tech Sudha You Tube Channel
- सातवे वेतन आयोग अधिसूचना
- शाळा सिद्धी मानके व मूल्यांकन आराखडा
- मतदार यादीत शोधा आपले नाव
- राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा मसुदा 2019 ( मराठी )
- सामान्य ज्ञान
Monday, 18 August 2025
Wednesday, 14 May 2025
ऑपरेशन सिंदूर विरुद्ध 2.5 फ्रंट
दिनांक 8 जून 2017 रोजी आपल्या एका मुलाखतीत तत्कालीन भारतीय आर्मीचे प्रमुख आणि माजी CDS जनरल बिपिन रावत यांचे वाक्य आज आठवले...
“Indian Army is fully prepared for a simultaneous multi-front war on both external and internal fronts ”
“Indian Army is fully ready for a two and a half front war ”
साभार - The Hindu
वरील वाक्याचा सोप्या मराठी भाषेत अर्थ म्हणजे, भविष्यात जर युद्धजन्य परिस्थिती उद्भवली तर भारताला भारताला एकाचवेळी बाहेरील दोन आघाड्या आणि भारतातील 0.5 आघाडी यासोबत लढा द्यावा लागेल...
बाहेरील दोन आघाड्या कोणत्या असतील हे सांगायला कुण्या जाणकारांची गरज नाही पण अंतर्गत 0.5 आघाडी म्हणजे काय ? आणि कोण ? परत ह्या आघाडीत हेतुपुरस्सर भारतीय सैन्याचे खच्चीकरण करणारे आणि अजाणतेपणी राजकीय द्वेषाने पछाडलेले आपल्याच सैन्याला कोंडीत पकडू बघत असतात....हा लेख म्हणजे त्याचाच एक आढावा...
22 एप्रिल 2025 भारताच्या इतिहासातील आणि मानवी सभ्यतेचा लाज आणणारा दिवस.पाकिस्तान पुरस्कृत आतंकवाद्यांनी पहलगाम येथील बैसरन घाटीत पर्यटनाचा आनंद घेत असलेल्या निष्पाप भारतीय नागरिकांना धर्म विचारून गोळ्या घातल्या. ह्या नृशंस मानवी हत्याकांडात 26 नागरिक मृत आणि 20 नागरिक जखमी झाले. ही पद्धत हमास ही आतंकवादी संघटना वापरते. ही घटना एका क्रूर मानसिकतेचा ताजा पुरावा आहे. आतंकवाद्यांनी आता त्यांची रणनिती बदलली आहे. मोठे कट रचून ते वास्तवात आणण्यास खूप अडचणी असतात याउलट जम्मू काश्मिर मध्ये पर्यटनास येणारे पर्यटक आणि भाविक यांच्यावर हल्ला करणे फार सोपे असते. म्हणूनच मागील काही काळात असे हल्ले होण्याचे प्रमाण आणि निष्पाप नागरिक मृत्युमुखी वाढण्याचे प्रमाण वाढले होते. पहलगाम हल्ला हा योजनाबद्ध सुनियोजित हल्ला होता यात शंकाच नव्हती....पण कुठलाही आतंकवादी हल्ला हा जसा प्रत्यक्ष आतंकवादी घडवून आणतात तसाच त्यांना पडद्यामागून मदतीचा हात असतो...आणि हळूहळू हे सिद्ध होत आहे...
ही घटना भारतीय सुरक्षा यंत्रणा आणि संपूर्ण भारताच्या अखंडतेला आणि एकतेला एक आव्हान होते. अशातच भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आपला सौदी अरेबिया या देशाचा शासकीय दौरा अर्धवट सोडून भारतात परत आले तिकडे भारताचे गृहमंत्री श्री अमित शहा यांनी प्रत्यक्ष घटना स्थळाला भेट देऊन माहिती जाणून घेतली. पंतप्रधान मोदी यांनी गृहमंत्री, केंद्रीय सुरक्षा समिती आणि सर्व उच्चस्तरीय अधिकारी यांच्या बैठका घेऊन परिस्थिती आणि त्या परिस्थितीची दाहकता समजून घेतली.ह्या नृशंस हत्याकांडाचा भारत बदला घेणार याची कल्पना संपूर्ण जगाला आली होती. प्रधानमंत्री मोदी यांनी 24 एप्रिल 2025 रोजी बिहार येथे एका जनसभेला उद्देशून भाषण करताना सरळ सरळ पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्याचा इरादा बोलून दाखविला....आणि हा बदला कल्पनेपेक्षा भयंकर असेल असेही त्यांनी भर सभेत जगाला आणि पाकिस्तानला उद्देशून सांगितले....यावेळी श्री मोदी यांची देहबोली आणि आवाज एक वेगळीच धार होती. मुख्य म्हणजे जगातील कोणताच राष्ट्रप्रमुख अशी भाषा जाहीरपणे वापरत नाही म्हणून मोदींच्या या जनसभेत दिलेल्या या गंभीर संदेशाला एक असाधारण महत्त्व प्राप्त झाले. हे भाषण संपते न संपते तेच 0.5 फ्रंटवाले समोर आलेत आणि त्यांनी तोच आपला आलाप सुरू केला आणि तो एक “ सरहदो पे गोलिया चल रही है... वाला टुकार शेर समोर केला..मुळात इतक्यात बिहार राज्यात निवडणुका नाहीत....आणि दुसरे म्हणजे गोळीबार सरहद्दीवर नव्हता झाला तर देशांतर्गत झाला होता हे या फ्रंटवाल्यांचा ध्यानात असते...पण त्यांना मुद्दे भटकवायचे असतात...
भारत दहशतवाद आणि दहशतवादाला पोषण देणाऱ्या देशाला धडा शिकवणार हे आता स्पष्ट झाले. अशातच भारताने एकतर्फी सिंधू जलकारार रद्द करण्याची घोषणा करून भारतातून पाकिस्तानात वाहत जाणाऱ्या नद्यांचे पाणी थांबविण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.... १९ सप्टेंबर १९६० रोजी कराची येथे तत्कालीन भारतीय पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि तत्कालीन पाकिस्तानी अध्यक्ष आणि फील्ड मार्शल अयुब खान यांच्यात हा करार झाला होता. २३ एप्रिल २०२५ रोजी, भारताच्या परराष्ट्र सचिवांनी २०२५ च्या बैसरन खोऱ्यातील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित करण्याची घोषणा केली. हा पाकच्या अर्थव्यवस्थेवर खूप मोठा आघात होता...राष्ट्रीय हित लक्षात घेता एका रणनिती अंतर्गत घेतलेला हा निर्णय होता.पण आपल्याच देशातील काही 0.5 फ्रंट वाल्यांना हा निर्णय अमानवीय वाटला आणि अपशकून करायला ते समोर आले....भारत पाकवर हल्ला कधी करणार असे प्रश्न ते जाहीरपणे विचारू लागलेत...प्रश्न विचारणे हा जनतेचा हक्क आहे पण त्याची उत्तरे कृतीतून दिली जातात हे ह्याच्या गावीही नसते. तारीख आणि वेळ सांगायला ती काही लग्नाची आमंत्रण पत्रिका नाही...
अशातच भारताने तिन्ही सैन्यदल यांचा समन्वय साधून ऑपरेशन सिंदूर मोहिमेची आखणी केली...पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे नष्ट करणे हा या ऑपरेशन चा मुख्य हेतू होता..त्याप्रमाणे भारतीय हवाई दलाने आपल्याच हद्दीतून पाकिस्तानी दहशतवादी ठिकाणावर अतिशय उच्च दर्जाचे कसब आणि तंत्रज्ञान उपयोगात आणत ताबडतोब हल्ला चढविला. हा हल्ला बालाकोट येथे केलेल्या सर्जिकल स्ट्राईकपेक्षा वेगळा होता...कारण त्यावेळी आपण प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून यशस्वी हवाई हल्ला केला होता. ऑपरेशन सिंदूरने भावी युद्ध कसे असेल त्याची चुणूक जगाला दाखविली. या कारवाईत प्रत्यक्ष जमिनीवर सैनिक (आर्मी ) यांचा सहभाग फार कमी, सजग नौसेना आणि हवाई दलाचा मर्यादित वापर करून आपले भू - राजकीय ईप्सित साध्य करण्याचे कसब भारताने आत्मसात केले आहे हे जगाने आपल्या उघड्या डोळ्यांनी बघितले.अत्याधुनिक त्रिस्तरीय हवाई सुरक्षा यंत्रणा, छोटी व लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे आणि आत्मघाती ड्रोन व कुशल तंत्रज्ञ यांच्या जोरावर भारताने पाकिस्तानात खूप खोलवर मारा केला. यावेळी भारतीय क्षेपणास्त्रे आणि ड्रोन सरळ सरळ पाकिस्तानी हद्दीत त्यांना हवे ते ठिकाण नेस्तनाबूत करत सुटले होते..पाकिस्तानी चायनिज हवाई यंत्रणा सपेशल अपयशी ठरली...याउलट भारतीय हवाई यंत्रणा आणि रशियन S - 400 यांनी कमाल केली...सर्व पाकिस्तानी हल्ले अचूक टिपत त्यांना अगोदरच निकामी करण्याचे काम या सर्व यंत्रणांनी चोख बजावले....भारतीय हल्ले आणि बचाव इतका अभेद्य होता की, पाकिस्तानला याचा जबरदस्त सामरिक,आर्थिक आणि मानसिक धक्का दिला...0.5 फ्रंटवाले भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार हे विचारणारे आता, युद्ध नको बुद्ध हवा म्हणून याचना करत होते. अर्थातच जगाला बुद्धाची गरज आहेच...भारताची पण तीच भूमिका आहे. पाकिस्तान या देशाने नेहमीच हिंसेला प्रथम प्राधान्य दिले....आणि स्वरक्षणाचा अधिकार हा निसर्गदत्त आहेच.. देशहितासाठी.या अधिकाराचा वापर करणे ही बाब कायदेशीरच आहे.
भारतीय सैन्यदले पाकिस्तानवर जोरदार हल्ले करून शौर्यगाथा लिहित असताना 0.5 फ्रंटवाले एक नवीन हत्यार उपसत होते की, ज्याची मुले लष्करात नाहीत त्यांनाच युद्ध हवे असते. मग प्रश्न हा उरतो ज्यांची मुले लष्करात असतात त्यांना तरी युद्ध हवे असते काय ? युद्ध हे शेवटचा पर्याय असतो आणि युद्ध जर लादलेले असेल तर ते शर्थीने लढावेच लागते...आणि याआधी तरी जे युद्धे झालीत तेव्हासुद्धा हिच परीस्थिती होती. माजी पंतप्रधान स्व. पंडित नेहरू, स्व. लालबहादुर शास्त्री, स्व. इंदिरा गांधी, स्व. अटलबिहारी वाजपेयी यांनासुद्धा कुठे युद्ध हवे होते....? पण त्यावेळी सुद्धा आपल्या शूर सैनिकांना युद्धात बलिदान द्यावेच लागले...भारतीय सैनिक जे सीमेवर आपले कर्तव्य बजावत असतात त्यांना आपल्या देशावर आणि आपले भारतीय सामान्य जनतेवर विश्वास असतो की, माझ्यानंतर हा देश आणि येथील जनता माझ्या परिवाराची काळजी घेईल...ही प्रेरणाच त्याला सर्वोच्च बलिदानास प्रवृत्त करत असते....
ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानचे कंबरडे पूर्णतः मोडले...शेकडो दहशतवादी तर मारले गेलेत पण त्यांच्या मदतीला धावून जाणारा पाकिस्तान संपूर्ण जगासमोर उघडा पडला...कारण भारताने आधीच स्पष्ट केले होते की, कारवाई फक्त दहशतवादी ठिकाणावर होईल.त्यात पाकने प्रतिहल्ला करून संपूर्ण जगाला दाखवून दिले की, आम्ही दहशतवादी समर्थक आहोत. भारताने पाकचे अनेक हवाई तळ उद्ध्वस्त केलेत...त्यात नूर खान,रफीकी,मुरीद,सुक्कुर, सियालकोट,पसरूर,निवडी,सरगोधा,स्कार्दू,भोलेरी आणि जेकबाबाद. या तळाचा प्रामुख्याने सामवेश होतो.यात महत्वाचे म्हणजे पाकिस्तानचे अनेक प्रशिक्षित वैमानिक आणि कर्मचारी मारले गेलेत कारण त्यांना कल्पनाच नव्हती की, भारत देश इतक्या खोलवर भागात आक्रमण करेल...आणि महत्वाचे म्हणजे ही सर्व माहिती जगाला मिळावी यासाठी भारतीय सैन्यदलाने विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी या बहादुर महिला अधिकाऱ्यांना समोर करून संपूर्ण जगाला आणि पाकिस्तानला संदेश दिला की, आम्ही भारतीय शेवटपर्यंत एक आहोत.
युद्धविराम :
भारताच्या आक्रमक भूमिकेने पाकिस्तानचे कंबरडे मोडले गेले आणि भारत आपले सर्व ईप्सित साध्य करण्याच्या जवळ असताना अचानक युद्धविराम होणार याची कुजबुज सुरू झाली. आतापर्यंत भारताला समर्थन देणारे अमेरिका आणि इतर देश युद्धविराम व्हावा यासाठी आग्रही होते.काय असेल नेमके कारण ? बातमी मध्येच बातमी लपलेली असते...इतके सारे घडत असताना एकाही पत्रकाराला याची कुणकुण लागू नये ? 9 मे रोजी भारतीय ब्रह्मोस मिसाईल आणि स्पाईस 2000 या बंकर भेदी बॉम्बने संपूर्ण पाकिस्तानात एकूण 11 ठिकाणी मारा केला. त्यात महत्वाचे केंद्र म्हणजे 1)नूर खान - रावळपिंडी.2)सरगोधा - पाकिस्तानचे अणुऊर्जा केंद्र.3)जेकबाबाद – एफ-१६ आणि अण्वस्त्रांचा बालेकिल्ला. या ठिकाणावर अचूक हल्ला केला गेला...आणि या युद्धाची चक्रेच बदलली....पाकिस्तानात म्हणे अचानक भूकंप 4.1 आणि 5.7 तीव्रतेच भूकंप आला...अचानक पाकिस्तानी NCA ची मीटिंग त्यानंतर वॉशिंग्टन, बीजिंग इत्यादी ठिकाणी फोन लागले असतील.... आणि अमेरिका सक्रिय झाला....कारणे काहीही असो पाकिस्तान देश कसाही असो....पण अमेरिकेला दक्षिण आशियात पाकिस्तानचे अस्तित्व पाहिजे म्हणजे पाहिजेच...काय झाले असेल वरील तीन हवाई तळावर ? अमेरिकेने भारताला युद्धविराम करण्यास राजी केले हे मान्य पण अटी भारताच्या होत्या....त्यातील पहिली मुख्य अट म्हणजे युद्धविराम म्हणजे फक्त Pause अर्थात Stop नव्हे. भारत कधीही आपली आघाडी उघडू शकतो. लवकरच दुपारी 10 मे दुपारी 3.35 वाजता पाकिस्तानच्या डीजीएमओने भारताच्या डीजीएमओला संदेश पाठवला: "आम्ही आमचे शस्त्र खाली ठेवण्यास तयार आहोत." या प्रस्तावावर भारत आपल्या शर्तीवर राजी होणार हे अमेरिकेला माहीत होते....कारण पाकिस्तानात आक्रित घडले होते आणि भारत हा एक संवेदनशील जबाबदार देश आहे हे अमेरिका आणि संपूर्ण जग जाणून आहे
संध्या. 6.00 वाजता – भारत सरकारने युद्धविराम घोषणा केली....पण त्यापूर्वीच तिकडे अमेरिकेन डाव साधत डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदीची घोषण केली...
मग नेमके असे काय घडले असेल की, सर्व जग खडबडून युद्धबंदीच्या मागे लागले ? ते आलेले भूकंप नैसर्गिक होते काय ? की भारतीय ब्रह्मोस मिसाईलचा आवाज होता तो ? F - 16 विमाने त्यांचे काय झाले ? त्यांनी आकाशात झेप घेण्यापूर्वीच काही झाले असेल काय ? F - 16 परत एकदा जायबंदी म्हणजे अमेरिकेच्या शस्त्र उद्योगाला घरघर..किंवा भारतीय हवाई अगदी पाकिस्तानच्या वर्मावर घाव तर नाही केला...आणि जर हे सत्य आहे तर ते भारताचा विजय आहे...आणि इतकी मोठी आघाडी घेतल्यावर नरेंद्र मोदी माघार घेणारे व्यक्तिमत्व नाही... की, भारताने असे काही केले जे......म्हणून शांत रहा....विजय खूप मोठा आहे...पण तो जगजाहीर करता येणार नाही... आणि करायचा पण नसतो.
युद्ध हे नेहमीच संहारक असते यात कुठलाही वाद नाही पण भारताने यावेळी स्वतःची कमीत कमीत हानी होऊ देता...पाकिस्तानला एक जोरदार तडाखा दिला आहे...यासाठी आवश्यकता असते ती संयम, सराव, आत्मविश्वास सोबतच तंत्रज्ञान आणि तज्ञांची. अफाट पैसा खर्च करून युद्धसामग्री विकत घेऊन युद्धे जिंकता येत नाहीत तर त्यासाठी निष्ठा आणि धर्म आपल्या बाजूने हवा असतो हे भारताने परत एकदा सिद्ध करून दाखविले आहे...अशा युद्धात अवकाश संशोधन,अर्थशास्त्र, देशाची एकता, हवामान आणि महत्वाचे म्हणजे अनुशासित सैन्यदले, परिपक्व राजकीय नेतृत्व आणि राष्ट्रवादी जनतेची साथ आवश्यक असते...जे भारताने जगाला परत एकदा सिद्ध करून दाखविले...सोबतच 0.5 फ्रंट लोकांनी जिओपॉलिटिक्स आणि संरक्षण यावर चिंतन करणे गरजेचे आहे......
0.5 फ्रंट काही आवडती वाक्ये....
पहलगाम हल्ला नंतर लोक
1) पाकिस्तान वर हल्ला करा, पाकिस्तानला कधी धडा शिकवणार
2) Mock ड्रील करून काय फायदा , बिहार निवडणुकी साठी फक्त वातावरण निर्माण केलं जातंय देशात युद्धाचं
पाकिस्तान मध्ये अतिरेकी तळावर हल्ला केल्यावर लोक
1) बिहार निवडणुकी साठी हल्ला केला..
2)दोन्ही बाजूच्या निष्पाप लोकांचा बळी दिला युद्ध करून.
3)देशाला युध्दाची गरज नाही. फक्त अतिरेकी शोधून मारा.
4) स्वतः ला इतिहासात अजरामर करण्यासाठी मोदी pok घेणार. देश भिकेला लागला तरी चालेल त्यासाठी...
5) देशाला युद्ध परवडणार नाही. देश 10 वर्ष मागे जाईल
मर्यादित हल्ले केल्यानंतर शस्त्रबंदी केल्यावर लोक
1) युद्ध का थांबवलं, ?
2) POK का नाही घेतला ?
3) शेपूट खाली घातलं....
ता . क.
जगातील अण्वस्त्र संपन्न चौथ्या क्रमांकाच्या सैन्यदलाचे माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे साहेब नुकतेच 11 मे रोजी आपल्या भाषणात सांगत आहेत की, युद्ध हा काही रोमँटिक सिनेमा नाही, युद्ध ही फार गंभीर आणि जोखमीची बाब आहे, युद्ध हा शेवटचा पर्याय असायला हवा. म्हणूनच आपले पंतप्रधान म्हणाले होते की, हा युद्धाचा काळ नाही....पण अविचारी शक्ती आपल्याला युद्धात ढकलण्यासाठी प्रयत्न करतील....पुढे ते म्हणतात की, एक सैनिक म्हणून मी युद्धासाठी नेहमीच तत्पर आहे...पण युद्ध ही माझी प्राथमिकता नाही....सर्व प्रश्न हे चर्चेतून सोडविण्याचा माझा प्रयत्न असेल...शस्त्र संघर्ष हा कुठलाही पर्याय असू शकत नाही....प्रश्न देशांतर्गत असो की, आंतरराष्ट्रीय हा चर्चेतूनच सोडविला गेला पाहिजे.....ही मुलाखत सगळ्यांनी अवश्य बघावी...आणि 0.5 फ्रंट वाल्यांनी आपण कुणाच्या तरी हातचे खेळणे अथवा शत्रू राष्ट्राच्या Spy War चे बळी तर नाही पडत आहोत ना याची खात्री जरूर करून घ्यावी.
म्हणून नेहमी लक्षात असू द्या युद्ध हा शेवटचा पर्याय असतो...त्यात लहरीपणा न करता ईप्सित साध्य झाले की Pause घ्यावाच लागतो.....
© गणेश
Friday, 13 September 2024
प्रतिपश्चंद्र
Tuesday, 16 July 2024
हिंदू धर्माची व्याप्ती
सुखं नास्ति विना धर्मं तस्मात् धर्मपरो भव ॥
पृथ्वीवरील सर्व प्राण्यांना सुखाची लालसा असते परंतु धर्माचनाशिवाय सुख नाही म्हणून मानवाने धर्मपरायन बनावे असे हिंदू धर्म सांगतो. ह्या सुखप्राप्तीसाठी ( ऐहिक ) हिंदू धर्म थोडक्यात दोन सार सांगतो अ ) जगात एक सर्वश्रेष्ठ सर्वव्यापी, अनादी, अनंत अंततः एकाच सत्य ( सत्व ) आहे. वैयक्तिक सत्व हा केवळ त्या सर्वव्यापी सत्वाचा एक अंश आहे आणि ह्या सर्वव्यापी सत्वाची जाणीव प्राप्त करण्यासाठी सतत प्रयत्नशील रहा. ब ) आत्मप्राप्ती, सर्वव्यापी तत्वांशी एकरूपता आणि त्या दैवी तत्वांशी संबद्ध होणे किंवा मोक्ष हेच जीवन साधनेचे उद्दिष्ट्य आहे आणि यातच जीविताचे व संपूर्ण मानव समाजाचे सार्थक आहे. फक्त एका विशिष्ट असा समुदाय डोळ्यापुढे न ठेवता पृथ्वीवरील सर्व सजीव व अखिल मानव समाजाला आदर्श जीवन जगण्याची संकल्पना हिंदू धर्म आपल्यापुढे अगदी सहज सोप्या पद्धतीने सांगत आहे. हिंदू धर्म कर्मप्राधान्य धर्म आहे. जीवनाच्या विविध टप्प्यात आपले कर्मप्राधान्य कोणते असावे याचे आदर्श विवेचन भगवान श्रीकृष्णांने अर्जुनाला कुरुक्षेत्रावर श्रीमद भगवदगीतेमध्ये सांगितलेले आहे म्हणूनच भगवदगीता संपूर्ण हिंदू आणि मानवी समाजाला मार्गदर्शक असा पवित्र ग्रंथ मानला जातो.
आज संपूर्ण जगात सर्वत्र हिंसेने थैमान घातले असताना हिंदुबहुल भारत देशात सर्व धर्मीय भारतीय मात्र गुण्यागोविंदाने नांदत आहेत यातच हिंदू धर्माची खरी व्याप्ती दिसून येते. आ सेतू हिमालय पसरलेल्या या देशात सनातन असा हिंदू धर्म अस्तित्वात असताना देखील ह्याच मातीत दोन नवीन धर्माने आपले अंकुर रोवले आणि जगाला परत एकदा अहिंसेच्या पुनरोच्चार व विश्व बंधुतेचा मार्ग दाखविला. त्यापैकी एक म्हणजे बौद्ध धर्म आणि दुसरा म्हणजे जैन धर्म. हिंदू धर्माची व्याप्ती इतकी मोठी की, या दोन धर्माला व त्यांचे पालन करणाऱ्या धर्मियांना आपले शत्रु न मानता ह्या देशात त्यांना धर्म परंपरा पालन करण्याची मोकळीक दिली...कारण सर्वच धर्म अखिल मानव जातीच्या कल्याणाचा मार्ग सांगतात..असे हिंदू धर्म मानतो. आपल्या धर्माचा अर्थ कसा काढायचा हे मात्र त्या त्या धर्मीय बांधवावर अवलंबून आहे. जगात सर्व धर्मात आस्तिक ही संकल्पना अस्तित्वात आहे म्हणजे त्या त्या धर्माने सांगितलेल्या मार्गावर तुम्हाला चालावेच लागते. हिंदू धर्माची व्यापकता मात्र इतकी मोठी आहे की, एखादा व्यक्ती नास्तिक असेल तर त्यालासुद्धा हिंदू धर्म सामावून घेतो.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणतात, ‘हिंदू धर्म हा बहुरूपी आणि परस्परविरोधी प्रवृत्तींचे संमिश्रण होऊन बनलेला आहे. या धर्माच्या दोन बाजू आहेत. विशिष्ट प्रकारच्या सामाजिक चालीरीती किंवा समाज-रचनेचे विशिष्ट कायदे ही याची सर्वांत प्रमुख अशी बाजू आहे आणि परस्परविरोधी अनेक पारमार्थिक संप्रदाय ही त्याची दुसरी प्रमुख बाजू होय.’ तसेच ‘हिंदू धर्म ही विविध सामाजिक आचारविचारांची एक गठडी किंवा एक संग्रह आहे आणि विसदृश आध्यात्मिक व पारलौकिक विविध कल्पनांचाही त्यात भरणा आहे.’ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् म्हणतात, ‘अनेक उपासनामार्ग, विविध उपास्य देवता, बहुविध धर्मद्रष्टे यांचा त्यात संग्रह आहे. हा धर्म व्यक्तिनिष्ठ नाही हा विशिष्ट पंथाचा आग्रह धरीत नाही हा धर्म अधिकारभेदाने सगळे धर्म संग्राह्य आहेत, असे मानतो… अनेक प्रकारचे पारमार्थिक उन्नतीचे पंथ यांच्यामुळे हिंदू धर्म परमतसहिष्णू झाला आहे.’ ‘वेदांविषयी प्रामाण्यबुद्धी, साधनांची अनेकता आणि उपास्य दैवत कोणते असावे यांविषयी निश्चित नियम नसणे, हे हिंदू धर्माचे लक्षण होय. ‘प्रामाण्यबुद्धिर्वेदेषु’ हे तत्त्व स्वीकारून पारंपर्यागत व श्रुतिस्मृति-पुराण-प्रतिपादित विधिसंस्कार किंवा आचार पाळणारा तो हिंदू होय’, असे लोकमान्य टिळक म्हणतात. इह व पर किंवा प्रपंच व परमार्थ साधण्याचा मार्ग हेच हिंदू धर्माचे स्वरूप होय. परधर्माविषयी सहिष्णुता हे हिंदू धर्माचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. तो सत्य, अहिंसा, दया, प्रेम इ. सद्गुणांवर आधारलेला आहे.
समस्त जगाचे कल्याण व्हावे तसेच संपूर्ण मानव जातीवर विशेष संस्कार व्हावे यासाठी हिंदू धर्माने वैज्ञानिक कसोटीवर खरे असे सोळा संस्कार मानवाला सांगितले आहेत. हे सोळा संस्कार हे हिंदू धर्मीयांचे संस्कार विधी आहेत. हे संस्कार मानवी मूल्याशी निगडीत बाब आहे. गर्भधारणेपासून ते विवाहापर्यंत हिंदू व्यक्तीवर, आईवडील व गुरूंकडून ज्या वैदिक विधी केल्या जातात त्यास संस्कार असे म्हटले जाते. सात्त्विक वृत्तीची जोपासना व्हावी हा संस्कार विधी करण्यामागचा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे. मनुष्यामध्ये असलेल्या सद्गुणांचा विकास व संवर्धन करणे तसेच दोषांचे निराकरण करणे हा संस्कारांचा पाया आहे. गुह्यसुत्रामध्ये यावर बरीच चर्चा केली आहे. अनेक ग्रंथामध्ये या संस्काराच्या विषयावर लिखाण केले गेले आहे. हिंदूंच्या पूर्वजांनी मानवजातीच्या कल्याणासाठी व उन्नतीसाठी संस्कारांची योजना केली आहे. संस्कार हा साधनेचाही विषय आहे. संस्कारामुळे ईश्वराचे स्मरण होते. माणसाचे व्यक्तिगत जीवन निरामय, संस्कारीत, विकसीत व्हावे व त्याद्वारे उत्तम, चारित्र्यसंपन्न, सुसंस्कारीत व्यक्ती निर्माण व्हाव्यात. त्याद्वारे चांगला समाज व पर्यायाने एक चांगले व सुसंस्कृत, बलशाली राष्ट्र निर्माण व्हावे हा यामागील प्रमुख उद्देश आहे.हिंदू धर्मातील सोळा संस्कार (षोडश संस्कार) खालिलप्रमाणे आहेत गर्भाधान ,पुंसवन,अनवलोभन,सीमंतोन्नयन,जातकर्म, नामकरण,सूर्यावलोकन,निष्क्रमण,अन्नप्राशन,वर्धापन, चुडाकर्म,अक्षरारंभ,उपनयन,समावर्तन, विवाह,अंत्येष्टी..
जगाला ज्ञान देणारे चार वेद, सहा शास्त्रे आणि अठरा पुराण तसेच रामायण, महाभारत आणि संपूर्ण जगाला आपले विराट दर्शन घडविणारी भगवद्गीता ही हिंदू धर्माने संपूर्ण मानवजातीला दिलेला अमूल्य असा ठेवा आहे. वेद,भगवद्गीता हे केवळ ज्ञानाची चर्चा करणारे वाङ्ममय नाही ज्ञानाचा विनियोग केव्हा करावा, कसा करावा याचे योग्य मार्गदर्शन करणारा महान ठेवा आहे. ७ नोव्हेंबर २००३ रोजी युनेस्कोने वेदांना ‘मौखिक’ म्हणजेच ‘अमूर्त अशी वाडवडिलोपार्जित मालमत्ता’, म्हणून घोषित केले आहे.संपूर्ण भारतीयांना अभिमान वाटावा, अशीच ही गोष्ट आहे. म्हणून वेदांचे जतन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.परंतु, हे केवळ ज्ञानाचे वैभव अथवा ठेवा म्हणून जपून न ठेवता लोककल्याणासाठी त्याचा योग्य विनियोग व्हायला हवा.समाजात अनेक प्रकारचे लोक असतात. जसे सज्जन असतात; तसे दुर्जनही असतात. सज्जनांमुळे समाज सुधारतो. समाजाला सन्मार्ग सापडतो. सज्जन समाजाच्या हितासाठी झटत असतो; पण दुर्जनाचा समाजाला त्रास होत असतो. दुसऱ्याला त्रास देण्यात, दुसऱ्याच्या सुखात विघ्न निर्माण करण्यात त्यांना आनंद वाटत असतो. अशा विघ्नसंतुष्ट लोकांच्या ठायी, दुष्ट, दुर्जनांच्या ठायी सद्विचार यावा, त्यांचे दुष्ट विचार गळून पडावेत अशी प्रार्थना संत ज्ञानेश्वर परमेश्वराकडे करतात.
यत्र नार्यस्तु पूज्यंते, तत्र रमन्ते देवताःTuesday, 19 September 2023
शासकीय अपरिहार्यता.....व्यवस्थेचे अपयश की आणखी इतर....?
Wednesday, 23 August 2023
We are on the moon......
Saturday, 29 July 2023
ग्रेट भेट
Wednesday, 25 January 2023
राष्ट्रीय मतदार दिवस
Tuesday, 5 April 2022
अ-सत्यमेव जयते
Sunday, 5 December 2021
उंबरठा ओलांडायचा....माफी पण नाही आणि विसरायचं पण नाही....
Friday, 21 May 2021
मी आणि नथुराम
Monday, 4 January 2021
डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील भारत आणि आजची शिक्षण व्यवस्था
Saturday, 2 January 2021
NH - 7 ( तो अकरा तासाचा प्रवास )
Tuesday, 10 November 2020
एडॉल्फ हिटलर आणि दुसरे महायुद्ध : सत्य आणि विपर्यास
मग शिक्षण आणि नौकरी निमित्त्यानं थोडं वाचन कमी झालं पण थांबलं नाही...एकदा एका मुलाखतीत आमच्या एका वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांनी प्रश्न विचारला की,दुसऱ्या महायुद्धाला कोण जबाबदार होतं ? मी उत्तर दिलं इंग्लंड.त्यांनी थोडं स्मित केलं.वर्षे लोटलीत आणि फेब्रुवारी 2019 ला फेसबुक वर एका पुस्तकाच्या प्रकाशनाची जाहिरात म्हणू या किंवा निमंत्रण बघण्यात आले. पुस्तकाचं नावं होतं “ एडॉल्फ हिटलर आणि दुसरे महायुद्ध : सत्य आणि विपर्यास ” शिर्षक बघताच माझ्यातील वाचक पुन्हा जागा झाला.मी सरळ पुस्तकाचे लेखक मा.श्री पराग वैद्य सरांना फोन केला पुस्तकाची माहिती घेतली आणि श्री सच्चिनानंद शेवडे यांच्या हस्ते प्रकाशित सदर पुस्तकाची कॉन्टिनेंटल प्रकाशन पुणे येथे मागणी नोंदविली...लेखकांचा आणि माझा एवढाच काय तो परिचय...
मनोगत व्यक्त करताना लेखक महोदयांनी पुस्तकाच्या नवव्या पानात आपल्या सर्व धारणांना हादरा दिलाय. हे पुस्तक म्हणजे काही कादंबरी नाही आहे.ना लेखकांनी कुठेही कल्पनेचे उंच झोके घेतले आहेत. जवळपास बारा वर्षे शेकडो पुस्तकांचे अखंड अध्ययन करून त्यांनी तटस्थपणे फक्त सत्यकथन केलेले आहे.यावरून लेखकांची प्रचंड मेहनत लक्षात येते.एखादया प्रश्नाचे उत्तर आपल्याला येत नसेल तर ते आपल्या शत्रूच्या गोटातून मिळवावं असं म्हणतात.लेखकांनी नेमकं तेच केलं त्यांनी नाझी जर्मन शत्रूच्या गोटात लिहिली गेलेली पुस्तके..प्रतिवृत्ते...इंग्लंड,अमेरिका,पोलंड,फ्रान्स,रशिया या देशाचे राष्ट्रप्रमुख,त्यांचे परराष्ट्र मंत्री,सचिव, राजदूत,इतर देशातील उच्च पदावरील शासनकर्ते यांच्यातील गुप्त चर्चा, दूरध्वनी,त्यांचे पत्रव्यवहार,त्यांच्या वैयक्तिक नोंदी,जगात विविध देशात एडॉल्फ हिटलवर लिहिली गेलेली हजारो पुस्तके,जागतिक वृत्तपत्रे व त्यातील लेख यांचा सखोल अभ्यास करून सदर पुस्तक आपल्या समोर मांडले आहे.नाझी शत्रूंना नेमके हिटलर या असामान्य योध्याविषयी काय वाटत होते आणि हेतुपुरस्सर जगापासून तो इतिहास का लपवला गेला ??? संपूर्ण जगास उत्तरार्ध सांगितला गेला पण पूर्वार्ध आपणापासून का दडवून ठेवण्यात आला.?नेमका हाच वेध या पुस्तकात घेतला गेला आहे. आपल्याविषयीचे अचूक सत्यकथन आपला शत्रूच करू शकतो,याविषयी कुणीही शंका घेऊ शकत नाही.सातशे अडतीस पानाच्या या पुस्तकात एकशे पंचवीस पाने फक्त संदर्भ ग्रंथाची यादी प्रसिद्ध करायला लागली आहेत.यावरून या पुस्तकाची सत्यता,भव्यता आणि मा.लेखक श्री पराग वैद्य सरांची चिकाटी आपल्या लक्षात येते.
आज ऐतिहासिक संदर्भात आपण आपल्या अवतीभोवती जे बघतोय आणि आपली धारणा करून बसतो ते अर्धसत्य असते.अन्यथा ब्रम्हचार्याचे व्रत करताना टेकू म्हणून आपले हात ठेवायला स्त्रिया कशाला हव्यात? जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी युद्ध कशाला हवे ???? या प्रश्नांची उत्तरे आपल्याला हवी असतील तर हे पुस्तक नक्की वाचा.सत्याच्या आड कुणाची तरी चमचेगिरी करायची आणि शांततेच्या बाता मारताना आपले धार्मिक अहंगंड कसे पूर्णत्वास नेले जातात याचा नेमका वेध या पुस्तकाने घेतला आहे..जेमतेम फक्त सहा महिने पुरेल एवढी युद्धसिद्धता असताना हिटलरने खरेच जागतिक युद्ध पुकारले होते काय? एका असामान्य योध्याने आपल्याला ज्याप्रमाणे सांगितले गेले आहे त्याप्रमाणे साठ लाख ज्यूंची हत्या केली होती काय?? जर्मनीत नेमके ज्यूंचे स्थान काय होते अथवा एक नागरिक म्हणून जर्मन देश उभारणीत त्यांची भूमिका काय होती याचा इतिहास खूपच मनोरंजक आहे.जर्मनीत वास्तवात गॅस चेम्बर होते काय?? आपणास जे गॅस चेंबर दाखविले गेले मग ते कोणत्या देशात उभारले गेले होते ?? तेथे नेमके काय सुरू होते ? दुसरे महायुद्ध हे एखादया सिनेमाच्या कथेप्रमाणे जर्मनीवर नाझी शत्रूंनी का लादले त्यातुन त्यांना काय हस्तगत करायचे होते ?? हे आजही गूढ आहे. हे गूढ आपणापासून हेतुपुरस्सर का दडविण्यात आले ??? या जगात खरंच सहिष्णुता सर्वधर्म समभाव नावाच्या गोष्टी असतात काय ??? की आपल्याला फक्त मूर्ख बनविले जाते...याचे उत्तर शोधणे हे आपले कर्तव्य आहे.कर्तुत्वशून्य माणसाला महान(महात्मा) म्हणून सांगायचे आणि जो आपल्या वैयक्तिक स्वार्थाआड येतो त्या महान सेनानीला अगदी योजनाबद्ध पद्धतीने खलनायक ठरवायचे हा आजवरचा इतिहास तपासायची तयारी असेल तर नेमकं हे पुस्तक वाचावे...
युद्ध हे ज्या देशांचे व्यसन होते आणि शस्त्र विक्रीतून मानवी संहार हे ज्यांचे ध्येय होते तेच देश आजही संपूर्ण जगाला शांततेचे आणि निशस्त्रीकरणाचे उपदेश देत असतात. जो अमेरिका आज संपूर्ण जगाला दहशतवाद विरोधी ब्रम्हज्ञान सांगत असतो, त्याचे स्वतःचे दुसऱ्या महायुद्धकालीन दहशतवादी कृत्ये या पुस्तकाने समोर आणली आहेत.तसेच आजच्या काळातील इराक व लिबिया येथे त्यांनी केली कृत्ये याचीच साक्ष देतात. जपान या देशाची अगतीकता त्यातून त्या देशाने स्वरक्षणार्थ उचललेले पाऊल याविषयी खूप विस्ताराने या पुस्तकात माहिती देण्यात आली आहे त्याउलट रशियाचा विस्तारवाद व त्यांच्या सेनेने संपूर्ण मानव जातीला लाजवून सोडतील अशी केलेली महाभयानक कृत्ये वाचतानाआपल्यालाही हादरवून सोडतात आणि नेमका हाच इतिहास आपल्यापासून दडवून ठेवला गेला आहे.आपल्याला ज्ञात नसलेले जैविक व रासायनिक युद्ध नाझी शत्रूंनी कसे पुर्णत्वास नेले.याचे संपूर्ण विस्तारीत विवरण या पुस्तकात मा.पराग वैद्य सरांनी अगदी अचूक मांडले आहे.
आपला छुपा धार्मिक विस्तारवाद जगावर थोपविण्यासाठी नाझी शत्रूंनी एक काल्पनिक शत्रू उभा करून संपूर्ण जगाला महायुद्धाच्या खाईत लोटले व वरून खोटा मानवता वादाचा बुरखा चढवत आपली पापे लपवून ठेवलीत.स्वतःला लोकशाही देश म्हणविणाऱ्या नाझी शत्रूंनी केलेल्या भयानक कत्तली जेव्हा या पुस्तक रूपाने आपल्यासमोर येतात तेव्हा आपणास चीड यावी इतके दुसरे महायुद्ध हे प्रकरण गंभीर आहे.या युद्धात खरंच अणूबॉम्ब वापरण्याची गरज होती काय ??? की अमेरिका ता देशाला त्याची युद्ध खुमखुमी भागवायची होती? नोबेल पारितोषिक विजेता व अणुबॉम्बचा जनक मानल्या जाणाऱ्या माणसाची वास्तविकता काय होती?? मनात आणले असते तर सर्व नियम धाब्यावर बसवून हिटलरला हे युद्ध जिंकता आले असते काय??? या सर्व प्रश्नांचा वेध या पुस्तकात घेतला गेलेला आहे.हे युद्ध पद्धतशिरपणे घडवून आणून इतका मोठा मानवी नरसंहार का केला गेला ? हे ज्यांना जाणून घ्यायची उत्सुकता आहे त्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचवयास हवे.असं म्हणतात की युद्ध हे कोणत्याच समस्येवर उपाय नसते.पण ते आपल्या देशाच्या आणि वंशाच्या संरक्षणासाठी लढावेच लागते. हिटलर या असामान्य योध्याने व लोकनियुक्त राष्ट्रप्रमुख म्हणून त्यांनी ते लढून आपले कर्तव्य पार पाडले.
मी काही समीक्षक नाही व तेवढी माझी पात्रता पण नाही. एक वाचक म्हणून मला जे वाटले ते मी येथे लिहिले आहे...खूप वर्षांनी एक अतिशय अभ्यासपूर्ण पुस्तक वाचायला मिळाले याबद्दल मी या पुस्तकाचे लेखक श्री पराग वैद्य सरांचे खूप खूप आभात मानतो. यासाठी त्यांनी जे शारीरिक,मानसिक व आर्थिक ताण सहन केला आहे त्याला तोड नाही.लेखकाच्या मनोगतापासून ते शेवटच्या पानापर्यंत आपणास लेखकांनी खिळवून ठेवण्यात यश मिळविले आहे आणि पुन्हा तोच विपर्यास केला गेलेला इतिहास आपल्या धारणांना हादरे देत जिवंत केला आहे. ज्या व्यक्तीवर आजवर हजारो पुस्तके लिहून त्याचं चारित्र्य हणन करण्यात धन्यता मानली गेली नेमकं त्याच प्रवाहाविरुद्ध बंड करून एका असामान्य योध्याला व राष्ट्रपुरुषाला न्याय देण्याचे धाडस या पुस्तकाचे लेखक मा. श्री पराग वैद्य सरांनी केले, त्याबद्दल मी स्वतः त्यांचा वैयक्तिक ऋणी आहे. नक्की वाचा....
भ्रमणध्वनी - 9881493820
